Posts

Showing posts from July, 2020

अध्याय तिसरा सारांश

Image
अध्याय तिसरा अतिशय महत्वाचा आहे हयात बाबांच्या मुखीची काही वाक्ये आणि त्यांची वचने ह्यांचा समावेश आहे. नामस्मरणाचे महत्त्व आणि बाबांच्या जवळ जाण्यासाठी हा अध्याय अतिशय उपयुक्त आहे.        नामस्मरणाचे महत्व  नाम संकीर्तन साध पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीचि ||1||        तुकाराम महाराज ह्या अभंगात नामस्मरणाचे महत्व सांगतात. नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे जन्मांतरीचि पापे धुवायला. नामस्मरणाने पापे फक्त धुउन नाही तर जळून जातात म्हणजेच काय तर समूळ नष्ट होतात.    नाम नारायण अंती उद्धारक |नामा म्हणे देख भाक माझी || संत नामदेवाच्या अभंगात त्यांनी नामाचे महत्व विशद केले आहे.  भगवंताच्या नामानेच उद्धार होणार आहे. त्याचा फक्त अंश देखील माझा उद्धार करणार आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्व वेळोवेळी मांडलेच आहे.       नामस्मरण हे असे बीज आहे जे उजाड जमिनीवरही ओलावा आणून त्यात बी सहज़ पेरले जाईल. त्या" बी " ला अंकुर फुटुन त्याचा सतत फुलनारे रोपटे येते. ह्या रोपट्याला खत पाणी मिळत ते सेवा आणि भक्तीच. नामस्मरणाचे बी पेरणारे आपण...

कानी आले शब्द माझ्या सद्गुरुरायाचे | अन धाव घेई मन झाले वेडेपिसे ||धृ ||

Image
कानी आले शब्द माझ्या सद्गुरुरायाचे | अन धाव घेई मन झाले वेडेपिसे ||धृ ||  चिव चिव असा चिऊताईचा आवाज जेव्हा सकाळी सकाळी कानावर पडतो तेव्हा अस वाटत माझा त्रिविक्रम बाप्पा मला उठवण्यासाठी आलाय. त्या चिऊताईच्या आवाजातुन बापुराया तुझ पितृवचन आठवते. Dad तुमचा आवाज कानी पडताच हरिगुरुग्रामची आठवण येते. डोळ्यातून पाण्याची धार लागते. बापू "सत्याला मरण नाही "असच विचार करुन तुझी बाळ त्याच वाटेवर जातात पण बाबा तरीही ठोकर लागते. बाबा कितीही कुणाशीही चांगले वागले तरीही ठेच लागून ढोपरं फुटतातच. रक्त येत जखमा होतात. बाबा जखमा शरीरावर होतात पण घाव मात्र मनावर उमटतात आणि त्यावेळी बाबा तुझा शब्दन शब्द आठवतो ते सर्व आठवून मन तुझ्याकडे धाव घेत. तुझ्या शब्दांसाठी मन वेडेपिसे होते. तुला पाहण्यासाठी डोळे भरून येतात. कोरन्टाइनच्या शेवटच्या चार महिन्यात मनाची अवस्था तुझ्या आठवणीने हळवी झाली आहे. Dad डिजिटल उपासनेतून तुझे शब्द जेव्हा कानावर येतात तेव्हा अस वाटत धावत -पळत तुझ्या समोर यावे आणि तुझ्या काठीची जागा घ्यावी जेणेकरून तुझा हाथ माझ्या डोक्यावरच राहील. जिथे तू तेथे मी. नजरेसमोरून दूरच नाही होऊं दे...

अध्याय तिसरा -भाग दोन -रोहिला कथा

Image
                    रोहिला कथा  शिर्डीमध्ये रोहिला नावाचा एक गृहस्थ आला होता. त्याला बाबांच्या प्रेमाने मोह पाड़ला होता. धष्ट -पुष्ट शरीर रचना असलेला रोहिला कोणालाच जुमानात नसे. अगदी साधे राहणीमान असलेला रोहिला शिर्डीत मशिदित येऊन राहिला होता . अंगात कफनी पायघोळ अश्या साध्या पोशाख तो शिर्डीत आला होता. रात्रं-दिवस तो जोर जोरात कुराणातील कमले वाचत असत. कधी मशिदित तर कधी चावडीत बसून तो जोर जोरात वाचन करत असे. दिवस रात्र उन्हातान्हात शेतात खपणारया लोकांना रोहिल्याच्या आवाजाने शांत झोप येत नसे. सर्वच जान रोहिलाला फार कंटाळले होते.बाबा प्रेमळ आहेत कण्वाळु आहेत ते रोहिलाला काहीच बोलणार नाही. मध्यरात्रि रोहिल्याच्या आवाजाने ग्रामस्थांची झोप मोडायची. बाबाना रोहिल्याच्या आवाजाचा कंटाळा येत नसे;पण त्याच्या आवाजाने बाकि सर्वाना खुप त्रास होत असे.            रोहिला माथेफिरू होता;आणि बाबांचा तो जवळचा होता. बाबांच्या प्रेमाने त्याला अजुनच ताकद मिळाली होती गावातल्या लोकाना विरोध करायची. तो बेफानपणे त्याला विरोध करण...

अध्याय तिसरा -भाग एक नामस्मरणाचे महत्व

Image
नामस्मरणाचे महत्व  नाम संकीर्तन साध पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीचि ||1||        तुकाराम महाराज ह्या अभंगात नामस्मरणाचे महत्व सांगतात. नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे जन्मांतरीचि पापे धुवायला. नामस्मरणाने पापे फक्त धुउन नाही तर जळून जातात म्हणजेच काय तर समूळ नष्ट होतात.   नाम नारायण अंती उद्धारक |नामा म्हणे देख भाक माझी || संत नामदेवाच्या अभंगात त्यांनी नामाचे महत्व विशद केले आहे.  भगवंताच्या नामानेच उद्धार होणार आहे. त्याचा फक्त अंश देखील माझा उद्धार करणार आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्व वेळोवेळी मांडलेच आहे.       नामस्मरण हे असे बीज आहे जे उजाड जमिनीवरही ओलावा आणून त्यात बी सहज़ पेरले जाईल. त्या" बी " ला अंकुर फुटुन त्याचा सतत फुलनारे रोपटे येते. ह्या रोपट्याला खत पाणी मिळत ते सेवा आणि भक्तीच. नामस्मरणाचे बी पेरणारे आपण असतो पण त्याला सेवा आणि भक्तीचे खत पाणी देण्याचे काम त्याची उन-पाऊस, वादळ -वारा, पुर -दुष्काळ ह्या सर्वांपासून योग्य काळजी घेण्याचे काम सद्गुरु करतो.आपण एक पाऊल टाकल की तो उरलेली 107 पाउल आपल्यासाठी टाकतोच.  ...

एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्ध मम घरी | आगमनाची वाट पाहतो, दे मज तुचि सबूरी ||

Image
पी -पी पियु, पी -पी  पियु असा खणखणीत आवाज काढणारा चातक पक्षी जसे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहतो. शेतकरी त्याच्या शेतातील धन -धान्याची वाट पाहतो. खेळाडू टूर्नामेंटची कलाकार त्याच्या कलेला कसा वाव मिळेल ह्याची वाट पाहतो. माणूस सुखाची वाट पाहतो. भोळे भाविक गणरायाची नवरात्रिची वाट पाहतात. तसेच बापू आम्ही तुझी वाट पाहतो. ही वाट पाहता पाहता न कळत मुखातून येते...            एकवेळ तू सहजचि ये रे, अनिरुद्ध मम घरी |            आगमनाची वाट पाहतो, दे मज तुचि सबूरी ||         हे सद्गुरुराया तुम्ही माझ्या घरी कधी येणार. तुमच्या आगमनाची मी आतुरतेने वाट पाहतेय. शबरीने जशी श्रीरामाची वाट पाहिली होती तशीच मी तुझी वाट पाहतेय. दारासमोर रांगोळ्याची रास घातली आहे. फुलांच्या माळा तयार आहेत. गोडीचे आप्पे तयार आहेत. तुम्हाला आवडते ते केसर पाणी पण तयार आहे. जेवनाचाही घाट घातला आहे. आता फक्त तुम्ही या. माते शबरी सारखी आणि बंधु भरतसारखी सबूरी आमच्यात उरली नाही. तुमच्या श्रीचरणांचे दर्शन घ्यायला मन आतुर झालाय.तुमची सेवा करायला उर ...

अध्याय दुसऱा सारांश

Image
         काकासाहेब दीक्षित हेमाडपंतांना भेटतात ते हेमाडपंतांना शिर्डीगावतील साईंचा महिमा सांगतात. त्यांच्याकडून शिर्डीला यायचा वचन घेतात हेमाडपंत जान्यास तयार होतात पण त्याचवेळेस त्यांच्या मित्राच्या मुलाचा मृत्यु होतो. त्यांचा मित्र हा निससीम गुरु भक्त असतो. त्याच्या मुलाच्या आजारपणात तो खुप उपासतपास करतो. मुलाला बर वाटाव म्हणून तो त्याच्या मुलाला त्याच्या गुरुच्या बाजूलाही ठेवतो. पण सर्व करुनही त्याच्या मुलाचा मृत्यु होतो.आणि ही सर्व परिस्थिति पाहुण हेमाडपंत शिर्डीला जान्याचे टाळतात.              नंतर काही दिवसांनी नानासाहेब चांदोरकर हेमाडपंतांना भेटतात ते देखील शिर्डीतील साईंचा महिमा हेमाडपंताना सांगतात. हेमाडपंत त्वरित शिर्डीत जान्यास निघतात. ते बांद्राहुन दादरला जाऊन मनमाड़ची ट्रेन पकड़नार असतात पण इतक्या चालत्या गाडीत एक गृहस्थ चढ़तो आणि त्यांना बोरीबंदरला जा असे सांगतो. त्या व्यक्तिवर विश्वास ठेउन हेमाडपंत बोरीबंदरहुन शिर्डीस जातात.              इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणज...

अध्याय दूसरा -भाग चौथा

Image
ऐसी मनात उदेली वृती | माधवरावांचे कानावरती  घातली परी साशंक चित्ति | कैसे मजप्रति साधे है | |48||         वरील ओवी वरुण एक गोष्ट स्पष्ट होते. हेमाडपंतानच्या मनात साईंविषयी कथा लिहण्याची इच्छा उत्पन्न होते. पण बाबांशी बोलण्याचा त्यांचा धीरच होत नाही. म्हणून त्यानी माधवरावाना बाबांची अनुमति घ्यायला सांगितली. पण त्या आधीच बाबाना सर्व कळले होते. बाळाच्या मनात काय चालले आहे तो कोणत्या व्यवस्थेत अडकला आहे हे गुरुला सांगण्या आधीच तो ओळखतो.  आलेची बाबा मंडळीनिशि | वाडियाचे कोपयर्रहपाशी | चला आधी धुळभेटिसी | मग ते लेंडीसी निघतील ||135||  ○      हेमाडपंत गाडीतून उतरल्यावर लगेचच त्यांना हा निरोप भेटतो. हेमाडपंताना भेटण्यासाठी स्वतः साईं अर्ध्या वाटेपर्यंत चालून आले होते. भक्तांइतकीच आतुरता देवालाही असते म्हणून तर पंढरीचा विठूराया त्याच्या भक्तांची वाट बघत कंबरेवर हाथ ठेऊन विटेवर उभा आहे.  ○         " चला आधी धुळभेटीसी "  ह्याचा अर्थ बाबाना भेटण्यासाठी आणि त्यांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी. पण हे चरण दर्शन फक्त नम...

थकले रे बापू ओढ़ता संसार आता दे विश्रांति तुझ्या पायी..

Image
जन्ममृत्युचे जाळे कोणालाही चुकले नाही. संसाराचा गाडा प्रत्येकाला खेचावाच लागतो. कधी सुख तर कधी दुख सोसत अनेक अडचणींना सामोरे जात जीवन जगणे चालूच असते. दैनंदिन काम करता करता कधी कधी अस वाटत, बस आता पुरे झाले... आता अजुन पुढे नाही होत आहे. दररोज सकाळी लवकर उठून सकाळच्या न्ह्यारी पासून ते रात्रीच्या अंथरुण घालण्यापर्यंत सर्वच काम करता करता शरीरात जणू प्राण उरतच नाही.        कधी कधी झोपेत पण माझी चपाती करपते की काय?दूध उतुन जातय.. घराला नीट कुलुप लावला असेल ना? आणि लाइट्स फैन बंद असतील ना... गैस बंद केला ना? अशी स्वप्न देखील पडतात. दिवस रात्र मेहनत करुन सुद्धा कधी कधी अस वाटत कुठे तरी आपण कमीच पडतो. कधी घरच्यांच्या मागण्या पुरवतना तर कधी ऑफिसची कामे करताना. बापू सर्वाना फक्त स्वतःच पडलेल असत."स्व" पना माणसात इतका भिनला आहे की दुसऱ्याबदल विचार करायला फार कमी वेळ मिळतो. अशा वेळेस बापू शरीराने तर आहेच पण मनाने देखील खुप थकल्यासारखा होत. आणि या थकलेल्या मनाला आणि शरीराला फक्त तुझ्या चरणांशीच विश्रांति मिळते.            थकले रे बापू ओढ़ता संसार...

अध्याय दूसरा -भाग तीन

Image
भक्त जी जी सेवा कल्पिती | संत स्वयेंचि करवूनी घेती| भक्त केवळ कारण निमित्ती | सकळ स्फूर्ति संतांची ||19|| तो एकमेव असा आहे की जो बाळाची भविष्याची स्थिति जाणून वर्तमानातच त्याच्याकडून सेवा करुन घेतो. जर येणारी स्थिति भयंकर असेल तर त्यानुसार सद्गुरु त्याच्याकडून योग्य ती सेवा करुन घेतात. आणि भविष्यात आनंद देण्यासाठी वर्त्तमानकाळापासूनच त्याचे प्रारब्ध कमी करतात.  ओवी क्रमांक 19:1+9=10=1+0=1 म्हणजे तो एकमेव तारणहार आहे. तो एकमेव असा आहे जो त्याच्या बाळासाठी काहीही करू शकतो.  माझी करोनिया लेखणी | बाबाचि गिरवीतील माझा पाणी | मी तो केवळ निमित्ताला धणी |अक्षरे वळवितो ||44|| अध्याय 2रा ओवी क्रमांक 44. 2+4+4=10 तो एकमेव  मी म्हणजे पेन, मी म्हणजे शाइ. पेन आणि त्यातील शाइ म्हणजे मी. पण त्या पेनाला म्हणजे लेखनीला गिरवनारा हा माझा सद्गुरु साईंनाथच आहेत. हेमाडपंत म्हणतात मी मूढ़ आहे. मला साईंनबद्दल कुठे काय माहित आहे. मी तर त्यांच्या नखाइतकापण ज्ञानी नाही. ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी आपण मोजु शकत नाही त्याचप्रमाणे सद्गुरुचे ज्ञान आपण मोजु मापू शकत नाही. त्यांच्या बद्द्ल आपण काहीच लिहू शक...